Thursday, June 3, 2010

चाँद तनहा है..

एके काळी मस्त लाईफ होती.. रोज संध्याका़ळी लायब्ररीत जाऊन नवीन पुस्तक आणायचं.. येईल तसा स्वयंपाक पक्षी: माझ्या नि फ्लॅटमेटच्या पोटावर प्रयोग करणारं काहीतरी बनवायचं.. ती आली की जेवायचं.. त्यानंतरच्याआवराआवरीचं आणि सास-बहू सिरियल पाहाण्याचं काम तिचं!! नि मी पळायचे माझ्या बेडरूममध्ये.. हातात पुस्तक.. नि सोबतीला.. विन ९४. वरचं खनक विथ रोशन अब्बास!!!! मस्त गाणी लागायची.. एक वाजेपर्यंत पुस्तक वाचूनसंपायचं आणि मी दुसर्या दिवशी नवीन पुस्तक आणायला सज्ज व्हायचे.. (रोज मला कुठलं पुस्तक द्यायचं म्हणूनतिथले लोक बिचारे वैतागले होते).

खनक आम्हा बर्याच जणांचा आवडता कार्यक्रम!! त्यात गुरूवारी रोशनऐवजी कुणीतरी यायचं.. एकदा अमीन सयानीहोस्ट होते.. नि त्यांनी त्यांच्या त्या टिपिकल आवाजात ओळख करून दिली..मीनाकुमारीने स्वतः लिहिलेल्या निस्वतःच गायलेल्या गझलांची.... नि वानगीदाखल ऐकवली तिची एक गझल.. "चाँद तनहा है.. आसमाँ तनहा!!!"

‍ ‍ माहित नाही ऐकताना नक्की काय वाटलं!!! पण त्या दिवशी पुस्तक पूर्ण नाही झालं.. :( नंतर ते गाणं शोधायचा खूपप्रयत्न केला.. खूप दिवसांनी असेच एकदा यूट्यूबवर Meena kuMaari : I write I recite या नावाने तो पूर्ण अल्बम मिळाला!!! :D





मीनाकुमारी.. शोकांतिकांची नायिका!!! तिच्या खाजगी आयुष्याबद्दल बरंच छापून यायचं.. अजूनही कधी कधी येतं.. मला ती खूप आवडायची असे काही नाही.. पण कधी नावडलीही नाही.. तिचा तो खर्जातला आवाज नि आपके पाँव जमींपर मत रखिए हे मात्र चांगलंच लक्षात आहे!!!! तिची ही गझल ऐकताच मनात एक घर करून गेली.. का? ठाऊक नाही.. कदाचित तिने ज्या परिस्थितीत लिहिलं असावं हे माहित असल्यामुळे जास्त दर्दभरं वाटलं..,तिच्या आवाजात जास्त दर्द आहे....., की शब्दांत जास्त दु: सामावलंय आहेत हे नाही मला सांगता यायचं..!!! पण एक मात्र खरं.. की एकाकीपणाचं दु: काय असू शकतं याचं हे सार्थ वर्णन ठरावं..




हापिसात यूट्यूब बॅन असणार्यांसाठी शब्दरचना येथे देतेयः

चांद तनहा है आसमां तनहा
दिल मिला है कहां कहां तनहा॥

जिंदगी क्या इसी को कहते हैं
जिस् तनहा है और जाँ तनहा॥

‍‍‍(जिथे काया आणि आत्मा देखील परक्यासारखे वागतात.. तिथे इतरांबद्दल काय बोलावं!!!! मी तरी इथं अगदी नि:शब्द!!)

हमसफर कोई गर मिले भी कहीं
दोनों चलते रहे तनहा तनहा॥

जलती बुझती सी रोशनी के परे
सिमटा सिमटा सा इक मकां तनहा॥

राह देखा करेगा सदियों तक
छोड़ जायेंगे ये जहां तनहा!!!


या गझलेच्या शेवटच्या ओळी मला "ये क्या जगह है दोस्तों" ची आठवण करून देतात.. भलामोठ्या आरशात स्वतःला पाहात उभी असलेली एकाकी रेखा.. नि "मेरे लिए भी क्या होई उदास बेकरार है" हा प्रश्न!!!! :(

No comments: